मुक्तीची आस मनी घेऊन
पाखरु उडाले सोडून कुडी
गांवकुसाची वेस ओलांडून
चालली संवेदनांची दिंडी
रामनामाचा गजर सभोवती
गर्द आभाळ चांदण्या विरक्त
एकमेका छेदत उंच लपेटती
आकाशी केशरी ज्वाळा आरक्त
प्रकाश अंधाराच्या वेशीतून
नश्वराचा ईश्वरी प्रवास
आपल्याच रंगात तल्लीन
बधीर जाणीवा मन उदास
वाट पावलात अडखळली
जेंव्हा वेळ झाली परतीची
पाप - पुण्य वजा करता
राख उरली आयुष्याची....
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
ही खूपच छान कविता आहे. अतिशय गंभीर विषय उत्कृष्टरित्या मांडलेला आहे.
-शैलेश
किती सुरेख लिहिलय... मायबोलीवर जितके सुरेख फोटो टाकतोस, तितकच सुरेख लिहितोस देखील! इथल्याही एकाच फोटोला कमेंट टाकली पण सगळेच फोटो सुरेख आहेत, अन लिखाणही अतिशय दर्जेदार!!
अगदी योगायोगाने तुझा ब्लॉग सापडला. :)
Post a Comment