मला सारखं आठवतं
आपलं पावसातलं भिजणं
तुझ्या गालावरून निथळणारं पाणी
मी बोटानी अलगद पुसणं
मग डोळे मोठे करुन
तुझं लटकेच रागावणं
नको नको म्हणत
माझ्या मिठीत हरवणं
सारं सारं आठवतं
विसरत काहीच नाही
एवढं मात्र ठावूक आहे
तो पाऊस पुन्हा पडणार नाही.....
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Wah... ekdum manala bhidte aapli kavita... masta..
Ashish Chandorkar
Post a Comment